आग्नेय आशियाई
राष्ट्रांची संघटना

आशियान हि
आग्नेय आशियाई राष्ट्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना होय. आशियान हि जगातील
एक महत्वाची क्षेत्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रा-राष्ट्रांचे
संबंध जसे संघर्षाचे असतात तसे ते सहकार्याचे देखील असतात. आंतरराष्ट्रीय
समुदायातील निरनिराळी राष्ट्रे सहकार्याच्या दृष्टीने एकत्र येऊ शकतात.
आशियान या
क्षेत्रीय संघटनेची स्थापना १९६७ मध्ये बँकाँक जाहीरनाम्याद्वारे झाली. या
संघटनेमध्ये पुढील १० देशांचा सहभाग आहे.
ब्रुनेई,
कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपाईन्स, सिंगापूर,
थायलंड आणि व्हिएतनाम इ.
भारत आणि आशियान
च्या प्रत्य्रेक देशाचे संबंध खूप प्रमाणात सारखे आहेत. यांचा फायदा भारताला
आग्नेय आशिया सोबत व्यापारी सामाजिक तसेच राजकीय संबंध ठेवण्यास भरपूर झालाआहे.
महत्वेकरून १९९१नंतर आपल्या देशाने या क्षेत्रीय संघटनेकडे लक्ष देण्यास सुरुवात
केली. त्यामुळेआग्नेय आशियाई देशांसोबतचे आर्थिक राजकीय संबंध दृढ होण्यास मदत
होते आहे. आपल्या देशाने आशियनचे महत्व ओळखून या संघटनेमध्ये सदस्यत्वासाठी
प्रयत्न सुरु केले आहेत
आग्नेय आशियाई राष्ट्रांच्य
संघटनेनेदेखील आता आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याबाबत विचार सुरु केलाआहे.
त्या दृष्टीने तिने आशीय खंडातील इतर राष्ट्रांशी आर्थिक आणि इतर क्षेत्रांत
सहकार्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहे. आशिया खंडातील काही राष्ट्रांना
क्षेत्रीय व संवाद भागीदार म्हणून आपल्यात सहभागी करून घेतले आहे. यामध्ये भारताचे
स्थान मजबूत असेच आहे; त्यामुळे आता या संघटनेशी भारताचे संबंध प्रस्थापित झाले
आहे. भारतव आशियान यांमध्ये शिखर संमेलने भरून आणली जात आहेत हे दोन्हींच्या
दृष्टीने अतिशय महत्वाचे पाउल होय.
आशियान आणि भारत
यांमध्ये मुक्त व्यापारी क्षेत्र स्थापन व्हावे असे भारताला नेहमी वाटते. आशियान
देशांनीही याबाबत पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.तसे झाल्यास भारताचे आशियान
देशांसोबत घनिष्ठ व्यापारी संबंध निर्माण होतील.
वैभव सुरेश कातकाडे
एम जे एम सी
के टी एच एम कॉलेज



